डिजिटल रुपी (DIGITAL RUPEE) म्हणजे काय व तो कसा वापरावा

 

डिजिटल रूपे म्हणजे काय व तो कसा वापरावा  

१-डिजिटल रुपी म्हणजे काय ?
उत्तर -डिजिटल रुपी केंद्र सरकारद्वारे समर्थित चलन असून ते रेसेर्वे बँकेने जरी केलेयायला नियमित चलन सारखेच परंतु इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील चलन आहै 

 

२-केंद्राद्वारे समर्थित डिजिटल चलन म्हणजे काय ?
उत्तर-हे इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील चलन सेंट्रल बँक म्हणजे आपल्या रिझर्व्ह  बँक ऑफ इंडिया (R B I ) यांच्या कडून पारंपरिक चालना सारखेच जरी केलेले व रिझर्व्ह बँकेच्या विश्वास व पत प्राप्त असलेले  चलन आहै . 

 

३-ई रुपी चे इकॉनॉमी मध्ये संचालन कसे असेल ?
उत्तर- RBI  ने सुरु केलेल्या ई रुपीचा उद्देश पारंपरिक कागदी चलनाला पर्याय उभा करण्याचा आहै. त्याचे संचालन किंवा उपयोग Digital Walt Q R कोडने Payment देण्या घेण्यासाठी करण्यात येईल . ज्यामुळे देण्या घेण्याचे व्यवहार सुरळीत होतील. 

 

४-UPI व्यवहारातून यामध्ये वेगळं काय आहै ?
उत्तर-Upi व्यवहार मध्ये दोन बँकेतील Account Link  असतात व अशी account व्यापारी बँकेकडून संचालित होत असतात मात्र ई रुपीचा उद्देश तुमच्या खिशातील बटव्यात असलेल्या रोकड चलनाला पर्याय उभा करण्याचा असतो व त्याला Reserv बँकेचे पूर्ण समर्थन असल्याने ई रुपी द्वारे होणाऱ्या व्यवहाराचे प्रतिबिंब व्यापारी बँकेच्या खात्यात दिसणार नाही . त्याचे सर्व  रेकॉर्ड स्वतः Reserve  बँक ठेवेल . 

 

५-ई रुपी मला कोणाकडून उपलब्ध होईल ?
उत्तर-सुरवातीला ई रुपी निवडक बँकांकडून विकत घेता येईल. मग त्या बँकेत तुमचे खाते असो अथवा नसो. हा व्यवहार बँक account मधून पैसे काढण्यासारखाच असेल विशिष्ट रक्कम भरल्यानंतर बँक तुमच्या ई रुपी Wallet  मध्ये जमा करेल . त्याचा विनियोग तुम्ही पारंपरिक रुपयांप्रमाणे करू शकाल. 

 

६-क्रिप्टो करेंसी होऊन हा व्यवहार कसा आहे ?
उत्तर -उत्तर क्रिप्टो करेंसी ब्लॉकचे टेक्नॉलॉजी वर आधारित असते ज्यामध्ये प्रत्येक व्यवहाराची नोंद होते व अशी नोंद कोणीही पाहू शकतो मात्र तीरुपी ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी वर आधारित असली तरी त्याबाबतचे रेकॉर्ड सर्वांना पाहता येत नाही

 

७-ही रूपे मध्ये मी गुंतवणूक करू शकतो का ?
उत्तर हे रुपी गुंतवणूक साधन नाही जमा केल्यानंतर किंवा गुंतवल्यानंतर त्यावर व्याज मिळेल ती रुपी ही केवळ इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील रोकड आहे ज्यामुळे तुम्हाला तुमच्या व्यवहारात त्याचा वापर करता येईल

 

८- ई रुपी काढण्यामागे सरकारचा उद्देश काय आहे ?
उत्तर -ई रुपी काढण्याचे उद्देश पुढील प्रमाणे 
-रोखचलन छपाई व हाताळणे यावरील खर्चात कपात. 
-रोकड रहित अर्थव्यवस्थेला चालना देणे. 
-व्यवहार सुलभ व रोख  व्यवहारांचा प्रवाह सुकर करणे. 
-यूपीआय व्यवहारांचा खर्च कमी करणे. 
-ई  रुपी विविध कारणांमुळे  CRYPTO  CURREYNCY ला  पर्याय ठरतो. 


 

९-यामुळे देशभरातील लोकांना कोणती लाभ होतात ?
उत्तर -लाभ पुढीलप्रमाणे 
- ई रुपीमुळे रोकड  हाताळण्यातील जोखीम नियंत्रित होते. 
-फाटक्या नोटांची चिंता पारंपारिक चलनात करावी लागते ई  रुपीमध्ये अशी चिंता करण्याचा प्रश्न उद्भवत नाही. 
-व्यवहार अत्यंत सुटसुटीत व कटकटी मुक्त होतात. 
-जमा व  पेमेंट यांच्या नोंदी ठेवणे सुलभ


 

१०-ई  रुपी ला कोणत्या आव्हानांना सामोरे जावे लागेल ?
उत्तर- त्याला पुढील आव्हानांना समोर जावे लागतील. 
-प्रत्येक व्यवहाराची नोंदणी बँक ठेवत असल्याने व्यक्तिगत गोपनीयता उघड होते. 
-ग्रामीण भागात आंतरजाल इंटरनेट उपलब्ध नसते त्यामुळे व्यवहार करणे अडचणीचे होईल. 
-सायबर सिक्युरिटी चे प्रश्न वाढतील. 
-केंद्रीभूत  माहितीचा वापर अधिकारी अन्यथा  करण्यासाठी करू शकतात .


No comments:

Post a Comment

 The Gruha Lakshmi Scheme  In Karnataka is a government initiative aimed at providing financial assistance to women who are the head of thei...